पृष्ठे

कस्तुरी जायते कस्मात्, को हन्ति करिणां शतम् |
भीरू किं कुर्वीत युद्धे , मृगात् सिंहः पलायते ||

- हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे. शेवटच्या चरणाचा अर्थ होतो - हरिणापासून सिंह दूर पळतो. पण हे कसे शक्य आहे? आधीचे तीन चरण वाचल्यावर त्याचा अर्थ लागतो - कस्तुरी कोणापासून मिळते ? - हरिणापासून , शंभर हत्तींना कोण मारतो? - सिंह आणि भेकड माणूस युद्धात काय करतो? - पळतो. अशाप्रकारे पहिल्या तीन चरणात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याची उत्तरे शेवटच्या चरणात एकत्र दिली आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: