पृष्ठे

परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम |
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||

- सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी , धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो.
(हा कृष्णाने अर्जुनाला गीतेत केलेला उपदेश आहे)
कस्तुरी जायते कस्मात्, को हन्ति करिणां शतम् |
भीरू किं कुर्वीत युद्धे , मृगात् सिंहः पलायते ||

- हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे. शेवटच्या चरणाचा अर्थ होतो - हरिणापासून सिंह दूर पळतो. पण हे कसे शक्य आहे? आधीचे तीन चरण वाचल्यावर त्याचा अर्थ लागतो - कस्तुरी कोणापासून मिळते ? - हरिणापासून , शंभर हत्तींना कोण मारतो? - सिंह आणि भेकड माणूस युद्धात काय करतो? - पळतो. अशाप्रकारे पहिल्या तीन चरणात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याची उत्तरे शेवटच्या चरणात एकत्र दिली आहेत.
याकुन्देन्दुतुषारहारधवला याशुभ्रवस्त्रावृता
यावीणावरदण्डमन्डितकरा याश्वेतपद्मासना |
याब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवै सदा वन्दिता
सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा ||

- जिने कुन्दकळ्यांचे पांढरेशुभ्र हार घातले आहेत, जिने श्वेतवस्त्र धारण केले आहे, जिच्या हातात वीणेचा दंड शोभून दिसतो आहे, जी श्वेत कमळाच्या आसनावर बसली आहे ,ब्रह्मा विष्णु आणि महेश यांसारख्या देवांना जी सदैव वंदनीय राहिली आहे अशी देवी सरस्वती माझ्यावर प्रसन्न होवो आणि माझ्या बुद्धीचे जड़त्व दूर करो.
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः |
न क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ||

- ह्याला शस्त्र तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी बुडवू शकत नाही आणि वारा ओढून घेऊ शकत नाही.
(हे आत्म्याचे वर्णन आहे. हिंदू तत्वज्ञानानुसार आत्मा अविनाशी समजला जातो)
पृथिव्यां त्रीणी रत्नानि , जलमन्नं सुभाषितम् |
मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञा विधियते ||

- पाणी, अन्न आणि सुभाषिते ही तीन रत्ने या पृथ्वीवर असताना मूर्ख लोक मात्र दगडांनाच रत्न म्हणतात.
अतिपरिचयादवज्ञा सन्ततगमनादनादरो भवति |
मलये भिल्लपुरन्ध्री: चन्दनतरुकाष्ठमिन्धनं कुरुते ||

- अति सहवासाने एखाद्या गोष्टीचे मोल समजत नाही.एखाद्या ठिकाणी सतत गेल्याने अपमान होतो.मलय पर्वतावर रहाणारी भिल्लाची स्त्री चंदनाच्या लाकडाचा उपयोग जळणासाठी करते.