पृष्ठे

निर्वाणदीपे किमु तैलदानं चौरे गते वा किमु सावधानम् ।
वयोगते किं वनिताविलासः पयोगते किं खलु सेतुबन्धः ।।

-  दिवा विझल्यानंतर त्यात तेल घालून काय उपयोग? चोर येऊन चोरी करून गेल्यानंतर सावधगिरी बाळगून काय उपयोग ? वय निघून गेल्यावर सुंदर स्त्रियांचा सहवास काय कामाचा? आणि पूर आल्यानंतर बांध घालून काय उपयोग?
प्रत्येक गोष्ट करण्याची एक वेळ असते. ती निघून गेल्यावर काही करून उपयोग नसतो. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: