पृष्ठे

वसन्ति कानने वृक्षाः फलपुष्पैश्च भूषिताः |
आम्रं विना परं चित्तं कोकिलस्य न तुष्यति ||

- वसंतॠतूमध्ये अरण्यातील वृक्ष फळाफुलांनी बहरून गेलेले असतात .पण कोकिळेचे मन मात्र आंब्याशिवाय संतुष्ट होत नाही.
ह्याला अन्योक्ती प्रकारचे सुभाषित म्हणता येईल. आजूबाजूला कितीही चांगल्या गोष्टी असल्या तरी काही लोकांचे मन एकाच विशिष्ट गोष्टीत गुंतून पडलेले असते आणि तिच्याशिवाय त्यांना खरा आनंद होत नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: