पृष्ठे

इच्छा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
इच्छा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
उदारस्य तृणं वित्तं शूरस्य मरणं तृणं |
विरक्तस्य तृणं भार्या निःस्पृहस्य तृणं जगत् ||

- उदार माणसाला पैसा हा गवताप्रमाणे असतो. शूर माणसाला मरण गवताप्रमाणे असते . विरक्ताला बायको गवताप्रमाणे असते तर सर्व इच्छांमधून मुक्त झालेल्या माणसाला सगळे जगच गवताप्रमाणे असते. 
काममय एवायं पुरुष इति।
स यथाकामो भवति तत्क्रतुर्भवति।
यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते।
यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते॥

- तुमच्या मनात खोलवर रुजलेली जी इच्छा असते तसेच तुम्ही होता .कारण जशी तुमची इच्छा असेल तशीच तुमची ताकद असते ,जशी ताकद असते तसेच काम तुमच्या हातून होते आणि जसे काम तुम्ही करता त्यावरच तुमची नियती (भवितव्य) ठरते .