पृष्ठे

शत्रु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शत्रु लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्राप्ताः श्रियः सकलकामदुधाः ततः किं न्यस्तं पदं शिरसि विद्विषतां ततः किम् |
सम्पादिताः प्रणयिनो विभवैः ततः किं कल्पस्थितास्तनुभृतां तनवः ततः किम् ||

(वैराग्यशतक -  भर्तृहरि)

- सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करणारे वैभव मिळविले तर मग पुढे काय? शत्रूंच्या डोक्यावर पाय ठेवला (शत्रूंचा निःपात केला )तर मग पुढे काय? आपल्या संपत्तीच्या जोरावर मित्र मिळविले तर मग पुढे काय? माणसांची शरीरे कल्पांतापर्यंत राहिली (माणसे अमर झाली) तर मग पुढे काय?

माणसाच्या इच्छा कधीही न संपणाऱ्या असतात.
जीवन्तु मे शत्रुगणाः सदैव
येषां प्रसादत्सुविचक्षणोSहम् |
ये ये यथा मां प्रतिबाधयन्ति
ते ते तथा मां प्रतिबोधयन्ति ||

- ज्यांच्या कृपेने मी एवढा हुशार झालो आहे असे माझे सर्व शत्रू कायम जगोत (कारण) जसे जसे ते मला अडथळा आणतात तसे तसे ते मला अजूनच शहाणे करतात. 
अग्नि: शेषं ऋण: शेषं शत्रु: शेषं तथैव च।
पुन: पुन: प्रवर्धेत तस्मात् शेषं कारयेत् ||

- शिल्लक राहिलेली आग , शिल्लक राहिलेले कर्ज आणि शिल्लक असलेला शत्रु हे पुन्हा पुन्हा बलवान होऊ शकतात (आणि त्रास देऊ शकतात) म्हणून ह्या गोष्टी कधीही थोड्यादेखील शिल्लक ठेवू नयेत.