पृष्ठे

दुष्ट-सज्जन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
दुष्ट-सज्जन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
 सत्सङ्गात् भवति हि साधुता खलानां साधूनां न हि खलसङ्गमात् खलत्वम् |
आमोदं कुसुमभवं मृदेव धत्ते मृद्गन्धं न हि कुसुमानि धारयन्ति ||

- चांगल्या संगतीमुळे दुष्ट लोकांच्या अंगी सज्जनपणा येतो. दुष्ट लोकांबरोबर राहिल्याने सज्जन लोकांच्या अंगी दुष्टपणा येत नाही. फूल खाली पडले असता त्याचा सुवास मातीला येतो. मातीचा वास फुलाला लागत नाही.
खलानां कण्टकानां च द्विविधैव प्रतिक्रिया |
उपानन्मुखभङ्गो वा दूरतो वा विसर्जनम् ||

- दुष्ट माणसे आणि काटे यांचा दोनच प्रकारे प्रतिकार करता येतो. एकतर चपलेने त्यांना ठेचायचे किंवा त्यांच्यापासून लांब रहायचे.
गुणायन्ते दोषाः सुजनवदने दुर्जनमुखे |
गुणा दोषायन्ते तदिदमपि नो विस्मयपदम् ||
महामेघः क्षारं पिबति कुरुते वारि मधुरम्
फणी पीत्वा दुग्धं वमति गरलं दुःसहतरम् ||

- सज्जन माणसाच्या मुखी दोष देखील गुण बनतात तर दुर्जन माणसाच्या मुखी गुण दोषाच्या रुपात प्रकट होतात ह्यात आश्चर्य काहीच नाही. ढग खारट पाणी पितात आणि मधुर असा पाऊस पाडतात तर साप मात्र दूध पिऊनदेखील अतिशय दुःसह असे विषच ओकतो.

दुर्जनः परिहर्तव्यो विद्यया भूषितोऽपि सन् |
मणिना भूषितः सर्पः किमसौ न भयङ्करः ||

- दुष्ट माणूस कितीही विद्याविभूषित असला तरीही त्याला टाळणेच उत्तम. अलंकाराने नटलेला असला तरीही साप भयंकर नसतो काय?

शैले शैले न माणिक्यं मौक्तिकं न गजे गजे |
साधवो न हि सर्वत्र चन्दनं न वने वने ||

- प्रत्येक पर्वतावर माणके सापडत नाहीत, प्रत्येक हत्तीच्या गंडस्थळात मोती नसतात, चंदनाचे झाड प्रत्येक अरण्यात नसते तसेच सज्जन माणसे सर्व ठिकाणी नसतात.
विद्या विवादाय, धनं मदाय्, शक्ति: परेषां परिपीडनाय ।
खलस्य: साधो: विपरीतमेतद् ज्ञानाय, दानाय, च रक्षणाय ।।

- दुष्ट लोकांची विद्या वाद घालण्यासाठी , संपत्ती माज करण्यासाठी आणि शक्ती इतरांना त्रास देण्यासाठी असते.चांगल्या माणसांच्या बाबतीत मात्र ह्याच्या उलटे असते. त्यांची विद्या ज्ञानासाठी (स्वतःला ज्ञान मिळावे म्हणून) , संपत्ती दान करण्यासाठी आणि शक्ती इतरांच्या रक्षणासाठी असते.
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम |
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ||

- सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुर्जनांचा नाश करण्यासाठी , धर्म प्रस्थापित करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो.
(हा कृष्णाने अर्जुनाला गीतेत केलेला उपदेश आहे)