पृष्ठे

समस्यापूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
समस्यापूर्ती लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भोजस्य भार्या मदविव्हलाया:
कराच्युतो हेमघटोपिपात्रम् |
सोपान मार्गेण प्रकरोति शब्दम्
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ||

- कामविव्हल झालेली भोजराजाची पत्नी जिन्यावरुन जात असताना तिच्या हातातील सोन्याचा घडा पडून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज झाला.
याच समस्यापूर्तीचे अजून एक सुभाषित येथे आहे.
कस्तुरी जायते कस्मात्, को हन्ति करिणां शतम् |
भीरू किं कुर्वीत युद्धे , मृगात् सिंहः पलायते ||

- हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे. शेवटच्या चरणाचा अर्थ होतो - हरिणापासून सिंह दूर पळतो. पण हे कसे शक्य आहे? आधीचे तीन चरण वाचल्यावर त्याचा अर्थ लागतो - कस्तुरी कोणापासून मिळते ? - हरिणापासून , शंभर हत्तींना कोण मारतो? - सिंह आणि भेकड माणूस युद्धात काय करतो? - पळतो. अशाप्रकारे पहिल्या तीन चरणात एकेक प्रश्न विचारला आहे आणि त्याची उत्तरे शेवटच्या चरणात एकत्र दिली आहेत.
रामाभिषेके जलमाहरन्त्या ,
हस्ताच्च्युतो हेमघटो युवत्या:।
सोपानमार्गेण करोति शब्दम्‌,
ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ:

- रामाच्या अभिषेकाच्या वेळी पाणी आणताना एका तरुणीच्या हातातील सोन्याचा घडा खाली पडला (आणि) (तो) जिन्यावरून ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: असा आवाज करत गेला.

हा समस्यापूर्तीचा श्लोक आहे.यात शेवटची ओळ दिलेली असते आणि त्याला सुसंगत अशा पहिल्या तीन ओळी बनवणे अपेक्षित असते. कवीच्या शिघ्रकवीत्वाचा यात पुरेपूर कस लागतो.वरील श्लोकात ठ ठं ठ ठंठं ठ ठ ठं ठ ठं ठ: ही ओळ समस्यापूर्तीसाठी दिलेली आहे. कवी कालीदास अशा समस्यापूर्ती करण्यामधे अतिशय पारंगत होता.