पुनर्वित्तं पुनर्मित्रं पुनर्भाया पुनर्मही |
एतत् सर्वं पुनर्लभ्यं न शरीरं पुनः पुनः ||
- गेलेला पैसा, गेलेले मित्र, गेलेली बायको किंवा जमीन (जागा) हे सर्व परत मिळू शकते. पण एकदा गेलेले शरीर मात्र परत मिळत नाही.
यथैकेन न हस्तेन तालिका सम्प्रपद्यते |
तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत् फलम् ||
- जसे एका हाताने टाळी वाजत नाही तसेच उद्योग न करता केवळ कर्माच्या (नशिबाच्या) जोरावर फळ मिळत नाही.
तथोद्यमपरित्यक्तं कर्म नोत्पादयेत् फलम् ||
- जसे एका हाताने टाळी वाजत नाही तसेच उद्योग न करता केवळ कर्माच्या (नशिबाच्या) जोरावर फळ मिळत नाही.
वातोल्लासितकल्लोल धिक् ते सागरगर्जनम् |
यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकम् ||
- वार्यामुळे ज्यावर पाण्याच्या लाटा उसळत आहेत आणि तरीही ज्याच्या किनार्यावर तहानलेले प्रवासी विहिरीची चौकशी करतात अशा समुद्रा, तुझा धिक्कार असो.
यस्य तीरे तृषाक्रान्तः पान्थः पृच्छति वापिकम् ||
- वार्यामुळे ज्यावर पाण्याच्या लाटा उसळत आहेत आणि तरीही ज्याच्या किनार्यावर तहानलेले प्रवासी विहिरीची चौकशी करतात अशा समुद्रा, तुझा धिक्कार असो.
लेबल:
धिक्कार
घृष्टं घृष्टं पुनरपि पुनश्चन्दनं चारुगन्धम्
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम् |
दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णम्
प्राणान्तेऽपि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ||
- चंदन पुन्हा पुन्हा कितीही वेळा उगाळले तरी सुवासच पसरविते , उसाचे कितीही बारीक बारीक तुकडे केले तरी तो गोडच लागतो, सोने आगीत कितीही वेळा जाळले तरी ते झळाळूनच उठते. कठीण परिस्थितीतदेखील उत्तम लोकांचे गुणधर्म बदलत नाहीत.
छिन्नं छिन्नं पुनरपि पुनः स्वादु चैवेक्षुकाण्डम् |
दग्धं दग्धं पुनरपि पुनः काञ्चनं कान्तवर्णम्
प्राणान्तेऽपि प्रकृतिविकृतिर्जायते नोत्तमानाम् ||
- चंदन पुन्हा पुन्हा कितीही वेळा उगाळले तरी सुवासच पसरविते , उसाचे कितीही बारीक बारीक तुकडे केले तरी तो गोडच लागतो, सोने आगीत कितीही वेळा जाळले तरी ते झळाळूनच उठते. कठीण परिस्थितीतदेखील उत्तम लोकांचे गुणधर्म बदलत नाहीत.
काममय एवायं पुरुष इति।
स यथाकामो भवति तत्क्रतुर्भवति।
यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते।
यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते॥
- तुमच्या मनात खोलवर रुजलेली जी इच्छा असते तसेच तुम्ही होता .कारण जशी तुमची इच्छा असेल तशीच तुमची ताकद असते ,जशी ताकद असते तसेच काम तुमच्या हातून होते आणि जसे काम तुम्ही करता त्यावरच तुमची नियती (भवितव्य) ठरते .
स यथाकामो भवति तत्क्रतुर्भवति।
यत्क्रतुर्भवति तत्कर्म कुरुते।
यत्कर्म कुरुते तदभिसंपद्यते॥
- तुमच्या मनात खोलवर रुजलेली जी इच्छा असते तसेच तुम्ही होता .कारण जशी तुमची इच्छा असेल तशीच तुमची ताकद असते ,जशी ताकद असते तसेच काम तुमच्या हातून होते आणि जसे काम तुम्ही करता त्यावरच तुमची नियती (भवितव्य) ठरते .
न तेन स्थविरो भवति येनास्य पलितं शिरः।
यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥
- केवळ केस पांढरे झाले आहेत (वयाने मोठे आहेत) म्हणून आदर मिळत नाही तर तरुण असूनही जे उत्तम शिकलेले, ज्ञानी आहेत त्यांनाच देव मोठे (आदरणीय) समजतात.
यो वै युवाऽप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ॥
- केवळ केस पांढरे झाले आहेत (वयाने मोठे आहेत) म्हणून आदर मिळत नाही तर तरुण असूनही जे उत्तम शिकलेले, ज्ञानी आहेत त्यांनाच देव मोठे (आदरणीय) समजतात.
अगाधजलसंचारी गर्वं नायाति रोहितः ।
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥
- विशाल अशा (समुद्राच्या) पाण्यात राहून देखील रोहित माशाला (एकप्रकारचा मोठा मासा) (आपल्या शक्तीचा ) गर्व नसतो.छोट्याश्या डबक्यात रहाणारी बारीक शफरी मासोळी मात्र उगीचच उड्या मारत असते.
थोडक्यात - उथळ पाण्याला खळखळाट फार.
अङ्गुष्ठोदकमात्रेण शफरी फर्फरायते ॥
- विशाल अशा (समुद्राच्या) पाण्यात राहून देखील रोहित माशाला (एकप्रकारचा मोठा मासा) (आपल्या शक्तीचा ) गर्व नसतो.छोट्याश्या डबक्यात रहाणारी बारीक शफरी मासोळी मात्र उगीचच उड्या मारत असते.
थोडक्यात - उथळ पाण्याला खळखळाट फार.
लेबल:
गर्व
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)